Saturday, January 2, 2010

Chess puzzle: Mate in two

White to play and mate in two...





~ Kaustubh

Chess puzzle: Mate in two

White to play and mate in two...









~ Kaustubh

On New Year Resolutions…2010

As always I have set a few (4 to be precise) New Year resolutions...some of them are tangible some are intangible.


I would not divulge the details of what those are. But in addition to that I have added 2 more to the list. These two are not the resolutions in themselves but decisions to pursue the other resolutions.


They are:


1. To be more anti-social: what I mean by this is...to reduce the time spent (both qualitative and quantitative) on 'social networking'. I feel that it should not become an addiction...and so I should consciously use it sparingly. In 2008, I took the first step towards it by deleting my Orkut profile...mainly because I found Facebook better and did not feel need to be there on both Orkut and Facebook. Now I wouldn't delete Facebook (or Linkedin or Twitter et al) account but would be less active. This also applies to online chatting/ email.


In short, I would reduce amount of 'online networking' but would focus more on 'offline networking' i.e. though blog etc. I feel that it would make me think and express (as opposed to real-time networking which is more of 'reactive' in nature).


I am also planning to re-do my blog (which is one of the action items on 'to do' list for 2010...


2. To stay away from any more resolutions: That is not to make any new resolutions unless I take the current one to some logical conclusion...e.g. achieved, abandoned or transformed into a new one.


~ Kaustubh

Saturday, December 26, 2009

भारतातील गरीबांची संख्या वाढली – बरे झाले!

सध्या मी ईकॊनॊमिक्स वाचतो आहे...नुकतीच अर्थतज्ज्ञ सुरेश तेंडुलकर यांच्या अहवालावरची एक बातमी वाचली. त्यांनी ’दारिद्र्य रेषेची’ नवी व्याख्या मांडली आहे, आणि त्यानुसार भारतातील ३७% टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे असा निष्कर्ष मांडला आहे.

सध्याची गरिबीची व्याख्या ही १९७३-७४ सालातली आहे. आणि ती उष्मांकावर (Calorie consumption) आधारीत होती (त्यातही शहरातील व्यक्तीला २१०० उष्मांक लागतात आणि खेडवळ व्यक्तीला, नाही चुकलो, ’ग्रामीण’ भागातील व्यक्तीला २४०० उष्मांक प्रतिमहिना असा भेदभाव होता!)

...म्हणजे प्रत्येक भारतीय किती Calories afford करु शकतो ह्या निकषावर आधारीत. त्या पद्धती प्रमाणे भारतातील २७.५% लोक २००४ मध्ये दारिद्र्य रेषेखाली जगत होते. पण ती पद्धत खूपच कालबाह्य झाली होती. मुख्य म्हणजे ती सर्वसमावेशक नव्हती (व्वा! काय भारदस्त शब्द आहे!)

जसा काळ बदलतो तश्या आपल्या गरजा पण बदलतात. कोणे एके काळी ’रोशनी, हवा, पानी’ म्हणजे ’प्रकाश, हवा आणि पाणी’ ह्या सजीवांच्या मुख्य गरजा होत्या. त्यानंतर अर्थातच ’रोटी, कपडा, मकान’ म्हणजे ’अन्न, वस्त्र आणि निवारा’.. पण जगणे म्हणजे फक्त ’जिवंत राहाणे’ नाही...त्यामुळे गरिबीची व्याख्याही फक्त ’जिवंत रहाणे’ याच्याशी निगडीत असू शकत नाही (किंवा पिंपरीत ही!)

पण आपल्या सरकारी व्याख्येप्रमाणे ज्याला अमूक ईतक्या Calories मिळतात तो गरीब नाही आणि ज्याला त्या मिळत नाहीत तो गरीब...इतकी साधी आणि सरळ होती. पण माणसाच्या शिक्षण, आरोग्य, घर/ जमीन, बाकी सामाजिक गरजा (छानछौकी, व्यसने सुद्धा!) ह्यात प्रतिबिंबित होत नाहीत (व्वा! परत एक भारदस्त शब्द...आज काय झाले आहे मला...फारच व्रुत्तपत्रीय परिभाषा वापरतो आहे)

म्हणजे हल्लीच्या काळापुरते बोलायचे तर वर सांगितलेल्या प्राथमिक गरजा थोड्या रुंदावून आता, ’वीज, मोबाईल, ईंटरनेट’ ह्या पण ’जीवनावश्यक गरजा’ होत चालल्या आहेत. कदाचित मनोजकुमार ’रोटी, कपडा और मकान’ चा सिक्वेल बनवेल - ’बिजली, मोबाईल और ईंटरनेट’ नावाचा! असो...

तर तेंडुलकर यांनी आपल्या अहवालात नेमका हाच बदल केला आहे. त्यांनी उष्मांकावर आधारीत गरिबीची व्याख्या बदलून कमीत कमी जीवनावश्यक वस्तूंना लागणारी किंमत ही प्रमाण मानली आहे. त्यानुसार पूर्वी ग्रामीण भागातील लोकांसाठी रु. ३५६ प्रतिमहिना आणि शहरी लोकांसाठी रु. ५३९ प्रतिमहिना ही ’दारिद्र्य रेषा’ होती. आता नवीन व्याख्येप्रमाणे ती ग्रामीण भागासाठी रु. ४४७ आणि शहरी भागासाठी रु. ५७९ ईतकी वाढवण्यात आली आहे.

तुम्हाला कदाचित वाटेल की ही वाढ फारच अल्प आहे...आणि ईतकी व्याख्या बदलून शेवटी ह्या आकड्यात काही फरक पडलाच नाही...पण ते तसे नाही. खालील तक्ता पहा म्हणजे कळेल:

भारतातल्या बहुसंख्य लोकांचे दररोजचे उत्पन्न हे २ डॊलर पेक्षा कमी आहे. रोज १ डोलर पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची संख्या ३५% आहे तर रोज २ डॊलर पेक्षा कमी उत्पन्न असलेले ७९.६% भारतीय आहेत!

म्हणजे केवळ १ डॊलर प्रतिदिन इतका बदल केला तर एकदम ३५ वरून ७९% ईतका मोठ्ठा फरक पडतो...आणि म्हणूनच गरिबीची व्याख्या इतकी महत्वाची आहे. कारण त्यामुळे अनेक कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर किंवा खाली जाऊ शकतात आणि त्यापासून मिळणाऱ्या योजनांपासून वंचित राहू शकतात.

हाच निष्कर्ष तेंडुलकर समितीच्या अहवालावरून सिद्ध होतोय...फक्त गरिबीची व्याख्या थोडी व्यापक करताच भारतातील गरीबांची संख्या २७.५% (२००४ मध्ये) वरुन एक्दम ३७% इतकी वाढली. जवळजवळ १०% म्हणजे तब्बल १० कोटी पेक्षा जास्त!

पण एका अर्थी हा गरिबीच्या व्याख्येतला मूलभूत बदल झाला हे चांगलेच झा
ले...त्यामुळे
ह्यापुढे तरी गरिबीचे खरे चित्र आपल्याला पहायला मिळेल. म्हणूनच मी शीर्षकात म्हणालो होतो - भारतातील गरीबांची संख्या वाढली - बरे झाले!

.............................................

मला वाटते गरिबी हटवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग सरकारसाठी हाच असेल - गरिबीची व्याख्या शिथिल करा... म्हणजे गरिबी रेषा ऎडजस्ट करा...आपोआप गरिबांची संख्या झटक्यात कमी होईल...नशीब अजून कोणा सरकारी अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यात असली योजना अजून आली नाहिये!

~ कौस्तुभ

Friday, December 25, 2009

हरकत नाही...संदीप खरे ची कविता

संदीप खरे ची अजून एक ’हळूवार’ कविता...

मला असल्या कविता अजिबात आवडत नाहीत...पण काही जणांना मात्र असल्या ’भावनेनी बरबटलेल्या’ (बरं.. तुमच्या भाषेत ’ओथंबलेल्या’) कविता आवडतात...आणि काहिंना ह्या असल्या कविता हव्या होत्या.

मी म्हणालो मी ईमेल नी पाठवतो...पण माझ्या ब्लॊग वर नाही टाकणार...पण हळू हळू असल्या कवितांची मागणी वाढू लागली, त्यामुळे शेवटी मी ही कविता इथेच पोस्ट करत आहे...पण असे असले तरी मी आधीच सांगितल्याप्रमाणे - ही माझ्या टाईप ची कविता नाही...असो!
--------------------------------------------------------------------------------------------------------------
हरकत नाही...
"अक्षर छान आलंय यात !"
 माझी कविता वाचताना
मान तिरकी करत ती एवढंच म्हणते...

डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर...
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
 कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली माझी कवितांची वही...

हरकत नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!
--संदीप खरे
-------------------------------------------------------
~ कौस्तुभ

Re-defining Poverty in India

I am reading Economics these days (I intentionally used word reading' and not 'studying' - reading is fun, studying may not be). So a less-publicized news report caught my attention and I did some research to follow it up.


The recent report by renowned economist Suresh Tendulkar states that 37.2% of the population in India is below poverty line as against 27.5% in 2004. This is not because India is not growing, but rather because Tendulkar has 'redefined' the meaning of poverty in the present context. And that was very much required; because as the report shows 1) The BPL (below poverty line) definition was skewed and 2) a slight change in the definition of poor can change the whole picture completely.


The earlier definition for 'poor' was a person from rural area who spends less than Rs. 356 per month i.e. less than $8 per month! (at Rs. 47 per USD); or a person from urban area who spends less than Rs. 539 per month i.e. $11.5 per month! (at Rs. 47 per USD) Now these figures were based on very old and outdated theory of consumption (set in 1973-74 and unchanged since then). It used no. of calories as a unit to measure the consumption - meaning that it was mainly based on nourishment i.e. food consumption i.e. spending on food i.e. prices of food. It did not take into account broader aspects of 'standard of living' such as education, health, clothing, land/house owned or other essential items.


The definition based on calories (food consumption) alone was probably right in the 50s and 60s when India did not even produce sufficient crops to feed its own population. But now (especially after 1990s) it makes little sense to use same old yardstick of 'no. of calories consumed' to define poverty.


The definition has to be more inclusive representing the current lifestyle. Shouldn't earlier essentials - Roti, Kaada aur Makaan be supplemented with Bijli, Mobile aur Internet?? Maybe yes - coz it would instigate Manoj Kumar to make a sequel to his pathetic film 'Roti, Kapda aur Makaan', giving us another master-piece of comedy. Jokes apart but there is another key aspect why the correct definition of poverty is extremely crucial - because it can change the whole picture of Indian Poverty!


Check the statistics below:







Just by changing poverty line from $1 per day to $2 per day (i.e. from Rs. 47 to Rs. 100) the % of poor in India increases from 35.1 to 79.6!!! That means almost 45% of population earns between $1 and $ 2per day. 


That means tweaking poverty definition by a few Rs. can change the number of poor in India significantly. And this is what has been confirmed by Tendulkar's report. The Tendulkar committee has revised the poverty line in terms of money spent per person per month. From Rs356.30 a month, this has increased to Rs446.68 in rural areas (i.e. from $8 per month to $9.5 per month). In urban areas it has risen from Rs538.60 to Rs578.8. (i.e. from $11.5 per month to $12.3 per month)


And the % of poor in India has increased from 27.5% to 37%!!! 
................................................................................................
I am now wondering how Government can make 'easy progress' on 'eliminating poverty' just by re-defining poverty downwards...

Sunday, December 20, 2009

झेंडा - शीर्षकगीत

आत्ताच अवधूत गुप्ते दिग्दर्शित ’झेंडा’ या चित्रपटाचे शीर्षकगीत मिळाले... चित्रपटाचे प्रोमो YouTube वर आहेच...त्यावरून हा चित्रपट सरळसरळ शिवसेना आणि मनसे यावर आधारीत आहे असे वाटते. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रपट कसा असेल याची उत्सुकता आहे (अर्थात जर तो प्रदर्शित झाला, किंवा होऊ दिला तर!)









शीर्षक गीत हे सारेगमप फेम ज्ञानेश्वर मेश्राम याने गायले आहे आणि संगीत अर्थातच अवधूत गुप्ते चे आहे...हे गाणे माझ्या ब्लॊग वरुन डाऊनलोड करु शकता






~ कौस्तुभ